Wednesday 9 April, 2008

" छँदाविषयी "- या पुस्तकाचे अवलोकन



छँदाविषयी - हे अनिल अवचट याच्या अनेक चाँगल्या पुस्तकाँपैकी एक पुस्तक.माणसाच्या आयुष्यात असलेले छँदाचे स्वरुप आणि त्याच्या स्वतः च्या जीवनातील विविध छँद वाढविण्यामागचे त्याँचे प्रयत्न याचे छान वर्णन या पुस्तकात आहे.


शिकणँ ही प्रक्रिया सतत चालूच असते. एखाद्या नव्या गोष्टी कडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो. हा शिकण्याचा काळच फार रम्य असतो.बोटे वळू लागतात. डोकँ त्या दिशेने चालून पकड घेउ लागतँ. आणि आपल्या हातुन एक नवीन गोष्ट उमटू लागते. ती एकच गोष्ट आपण अनेकदा करू लागतो.मग त्याचे वेड लागते.नन्तर आपण ती दुसर्याला करू देउ लागतो. प्रत्येक पायरीचा आनँद वेगवेगळा असतो.आनँद वाटल्या शिवाय त्या शिकण्याचे खरे सार्थक होत नाही.माझी अशी खात्री आहे की निसर्गाने प्रत्येकाला कलागुण दिलेलेच आहेत, त्याच्याकडे बघणे, ते वाढवणे, त्याला अग्रक्रम देणे आपल्या हातात आहे. त्याचा निर्भेळ आनँद लुटण्यासाठी त्याच्यातून पैसा मिळविण्यापासून किँवा किर्तीच्या विचारापासून दूर राहिलेलँ बरँच.
आपण या व्रत्तीने शिकत, प्रयत्न करत राहिलो तर कोण ना कोण गुरु भेटत राहतात.आणि कसली अपेक्षा न ठेवता महत्वाच असँ काही देउनही जातात. आपणही पुढच्याना याच भावनेनँ देत राहायचँ.अशा व्रत्तीतूनच कदाचित इथँ निकोप कला सन्स्क्रुती नाँदू लागेल हा भरवसा.

डोक्यात काही छँद असलेल्या माणसाँच मन काही वेगवेगळच असतँ.त्याला जे करावँ वाटतँ तेच तो करत असतो.ती कितीही क्षुल्लक गोष्ट असो.त्याचा अर्थिक फायदा असो वा नसो.त्यावेळी महत्वाची कामँ डोक्यावर बाँधलेली असोत तरी तो ती क्षुल्लक गोष्ट करीत बसणारच

Tuesday 8 April, 2008

? आपल्या काळात ?

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
................................................


शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी...
वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी...
कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून...
शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी...
पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी...
महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी...
आपण थांबून राहिलेले असतो .
एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल,
अशी आपणच आपली समजूत घातलेली असते .
पण, असं काही ठरवण्यापूर्वी
आनंदी होण्याचं ठरवा.

® http://www.orkut.com/Community.aspx?cmm=33294354

Saturday 5 April, 2008

माननीय, सन्माननीय, आदरणीय...

31 March च्या महाराष्ट्र टाइम्समधील सुरेख लेख - विजयराज बोधनकर

हल्ली या तिन्ही शब्दांची भलतीच चलती आहे. वाढदिवसांच्या निमित्ताने अनेक लोक माननीय होतात. माननीय व्हायला वयाची अट नसते. बड्यांचा मुलगा जसा आपोआपच माननीय म्हणून जन्माला येतो. त्याचे खूप वाढदिवस साजरे होतात आणि आपोआपच तो सन्माननीय होत जातो. नंतर खूप मोठमोठे वाढदिवस साजरे होतात आणि मग ते नकळत आदरणीय होत जातात.

अनेक वर्षांपासून ते कालपरवापर्यंत संकुचित वृत्ती होती ती, नावाच्या बाबतीत. अहो, आपल्या नावापुढे साधा 'श्री' लावायलाही लोक घाबरायचे, बाकीचं तर सोडाच! तेव्हा 'आदरणीय' हा मान कोणा पंडितजी, स्वामीजी किंवा बुद्धिमान उच्चविभूषितांनाच दिला जायचा. कारण स्वत:च्या कर्माने जो आदर निर्माण करायचा आणि मोठ्या विश्वासाने आदरणीय बनायचा, त्याला वास्तवतेचीच जोड असायची. चांगलं काम केल्यानंतर लोकांच्या मनात एक सन्मान निर्माण होतो. शिक्षक, कलाकार किंवा वक्ता यांनाच समाज 'सन्माननीय' संबोधायचा. जे देणग्या देतात, मोठ्या अंत:करणाने चांगल्या कामाला मदत करून आपला मान द्विगुणित करायचे अशांना समाज 'माननीय' म्हणायचा. म्हणजेच आदर, सन्मान आणि मान या तिन्ही शब्दांना योग्य तोच आणि तेवढाच न्याय मिळायचा आणि जे 'सो सो' जगायचे त्यांना 'श्री' किंवा जास्तीतजास्त 'श्रीमान' असे संबोधण्यात यायचं. म्हणजे सोन्याला सोनं, ताब्याला तांबे, पितळाला पितळ आणि लोखंडाला लोखंड म्हणण्याचाच तो काळ होता.

पण आता मात्र काळ बदलला. आता कोणीही केव्हाही कधीही सन्माननीय होऊ शकतो. ज्याला होडिर्ंगचं भाडं परवडतं, फ्लेक्सचा खर्च करणे शक्य आहे तो सन्माननीय होतो. इथे वयाची मर्यादा नसते. कर्तृत्वाची अपेक्षा नसते, अनुभवाचा तगादा नसतो. उत्तम फोटोग्राफर आणि सोबतीला कल्पक डिझाइनर हवा... काव्यात्मक लिहणारा कॉपी रायटर एवढी सामग्री तुमच्या हाताशी असली की तुम्ही ठरवा माननीय, सन्माननीय की आदरणीय बनायचं ते. कारण वाढदिवसावर (स्वत:च्या) प्रत्येकाचा हक्क असतो. वर्षातून एकदा तो साजरा करायचा असतो... मग लाजायचं तरी कशाला?

आपल्या शहरातील होडिर्ंग्ज हल्ली खूप कमवायला लागलेत. चांगला महसूल सरकारी तिजोरीत जातो. त्यातून बरीच विधायक कामं होऊ शकतात. किमान अशा समाज सेवेसाठी तरी आपण आपले वाढदिवस फ्लेक्सवर साजरे करायला हवेत. जेणे करून वाढदिवसाच्या पंधरा दिवस आधी तो फ्लेक्स लागला पाहिजे. यातून चाहता वर्ग तयार होतो आणि लगेचच पुढच्या वाढदिवसाला तुमच्या बॅनरवर (माफ करा, फ्लेक्सवर) तुमचे माननीय शुभेच्छुकसुद्धा येतात. तुमचं माकेर्टिंग फक्त तुम्हाला जमायला हवं.

आताचा काळ बराचसा निर्भय आणि न्यूनगंडमुक्त असा आहे. आपण कोण आहोत, आपलं कर्तृत्व काय, आपली बुद्धिमता किती, आपलं धडाडीचं कार्य, आपले विचार असा तुम्ही नीट विचार करत बसलात, तर आयुष्यात तुम्ही फ्लेक्सवर झळकणार नाही. त्यासाठी कठोर व्हा, निर्भय व्हा आणि स्वत:लाच प्रकाशात आणण्याचा विचार करा. मग, वाढदिवसानंतर सत्यानारायणच्या पूजेचा फ्लेक्स तयार करा. गणपती मंडळात निवड झाली तर त्याची प्रसिद्धी करा... साधं सहभागी प्रमाणपत्र मिळालं तरी संघ समजून त्याचा एक फ्लेक्स लावा.

दिवाळी, होळी, नवरात्र, आषाढी एकादशी, बुवाचं किर्तन, श्रींची पालखी, पास झालेले विद्याथीर् अशा हजारों कारणांसाठी तुम्ही फ्लेक्ससाठी तयार राहिलं पाहिजे. फक्त एकच काळजी घ्या... सारखेसारखे तुमचे फोटो बदलू नका... अहो, लोकं ओळखणार नाहीत. तुम्हाला त्याची सवय लागेल.

स्वत:च्या लग्नाचा फ्लेक्स, नातेवाईकांच्या बारशांचा, मित्राच्या लग्नाचा, ओटी भरण्याचा, जावळ काढण्याच्या कार्यक्रमातही फ्लेक्स करण्यासठी मागे-पुढे पाहू नका. यामुळे शहरातल्या नेहमीच्या चेहऱ्यांपेक्षा थोडे वेगळे चेहरे दिसतील आणि बघाणाऱ्या समाजाला थोडंसं वेगळं बघितल्याचं आत्मिक समाधान मिळेल. बकाल झालेलं शहरही अधिक वेगळं दिसायला लागेल.

पूवीर् बघा, स्वत:च राहतं घर, गाडी किंवा फोन घ्यायला अनेक वर्षं थांबावं लागायचं, पण आता सकाळी नावं नोंदवलं की ते सुख रात्रीपर्यंत दारात हजर. तसंच पूवीर् नावलौकिक मिळवायला प्रचंड मेहनत करावी लागायची. पण आता मात्र तसं नाही. एका रात्रीत किमान आठवड्यासाठी तरी तुम्ही हिरो बनू शकता. क्षुल्लक कारणासाठी भव्यदिव्य फ्लेक्स लावून आपल्याच प्रसिद्धीची तहान भागवू शकता. पण, एका गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या फ्लेक्सवर आदरणीय भितीयुक्त अशा तीन-चार सन्माननीयांचे फोटो टाकायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या नावापुढे किामन 'माननीय' हा शब्द तुम्हाला डकवता येईल. मग, तुम्हाला 'माननीय'ची सवय लागेल, ती वाढत जाईल आणि हा हा म्हणता त्या भागात आणि शहराच्या तुरळक भागात तुम्ही फेमस होतच जाणार. लोकांनी इतर मोठ्यांची केली, तशी तुमचीही टिंगल करतील. पण मनावर दगड ठेवा. लोकांच्या मनाचा,

शहराच्या बकालतेचा विचार करू नका. शहराची शोभा वाढवण्यासाठी कायम आपल्या चेहऱ्याची शोभायात्रा भरवत रहा म्हणजे शेवटी तुम्ही सन्माननीय आणि आदरणीय बनतच जाल. तेव्हा लगे रहो मुन्नाभाई... हरि ॐ हरी ॐ

Tuesday 1 April, 2008

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचे आहे
रोज सकाळी खड़या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे आहे
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचं आहे .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

मधली सुट्टी होताच वाटर बैग सोडून
नाळाखाली हात धरून पाणी प्यायचे आहे
कसा बसा डबा संपवत ....तिखट मीठ लावलेल्या
चिंच बोरं पेरू काकडी सगळँ खायचय
सायकलच्या चाकाला स्टंप धरून
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायाचय
उद्या पाउस पडून शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचे आहे
अनपेक्षित सुट्टीच्या अनंदासाठी.....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

घंटा व्हायची वात बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचे आहे
घंटा होताच मित्रांच कोदळँ करून
सायकलची रेस लावुनच घरी पोचयचं आहे
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपनातल्या
दोन तारेतुन निघून बाहेर पळायाच आहे
ती पळुन जायची मजा अनुभवायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचा आहे
दिवस भर किल्ला बाँधत मातीत लोळून पण
हात न धुता फरालाच्या ताटावर बसायचे आहे
आदल्या रात्री कितीही फटाके उड़वले तरी
त्यातले न उडालेले फटाके शोधत फिरायचे आहे
सुट्टी नंतर सगळी मजा मित्रांना सांगायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

कितीही ओझं पाठीवर असू दे ... जबाबदारीच्या ओझ्या पेक्षा
दप्ताराचं ओझं पाठीवर वागवायचं आहे
कितीही उकडत आसू दे .. वातानुकूलित ऑफिस पेक्षा
पंखा नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचे आहे
कितीही तुटका असू दे ओफिसच्या एकटया खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचे
" बालपण दे गा देवा " या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळाल्या सारखं वाटायला लागलय
ते बरोबर आहे का ते सरांना विचारायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

आपला बाप

हे लिखाण माझे नाही , कुठेतरी छानसे वाचलेले पण मनाला स्पर्श करून गेले म्हणुन डायरीत लिहून ठेवले होते तेच आता ब्लौग स्वरूपात आणले आहे.याचे लेखक कोण आहेत हे माझ्या स्मरनात नाही.


आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
आयुष्यातील श्रद्धास्थान .
आईवर खूप कविता आहेत.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.

बाप

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही




आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?
आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही.तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना?

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?

वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं.त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते.

Sunday 30 March, 2008

निवडक वपुं १

मैफ़लींचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो, तुम्च्यासमोर ठेवायचं. खरं तर, कुणी काही सांगावं, ह्याची तुम्हाला गरज नाही. तरीही सगळे लेखक लिहीत राहीले. वास्तविक, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं.

दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणुक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतली एकही छ्टा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहीली नसती तरी चाललं असतं. तरी इतकी पुस्तकं निघतात. कारण, अहंकार

मलाही जग समजलय हे सांगायचा अट्टहास.

मी तरी एवढं लेखन का केलं ?

मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं.
-------------------------------------------------------------------------------------------------

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल, तर क्षितीज नक्की गाठता यॆत. आपल्या रक्तातच धमक असॆल,तर जगंही जिंकता यॆत. आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं, त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं. असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद, त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं


-------------------------------------------------------------------------------------------------
एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा परिसराचं मौन म्हणजे एकांत; आणी परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण.एकाकी वाटलं तरं मनसोक्त रडावं.अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे.पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात.आणि दिसेनासे होतात,तसा माणूसही हलका होतो;आकाशाजवळ पोहोचतो.असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर ;तुकाराम - "तूका, आकाशाएवढा" असं लिहून गेला असेल.


-------------------------------------------------------------------------------------------------
निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे हे काळावर मोजायचं की बुद्धीवर ? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग ? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो. फ़क्त वेळ वापरायला शिकत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वॄंदावनातच रहाते. तिच्यापुढे आपल्याला उभंच रहावं लागतं.

-------------------------------------------------------------------------------------------------
ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते.

-------------------------------------------------------------------------------------------------
आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे? हे खरं त्यांना हवं असतं. त्याऎवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते आपल्याला ओळखतात.

-------------------------------------------------------------------------------------------------
तत्वाला चिकटुन कसं राहायचं हे पालीकडुन शिकावं. मुंगळा तसाच मान तुटली तरी गुळापासुन किंव्हा आपल्या पायाचा चावा घेतल्यशिवाय सोडत नाही. स्वत:च घर स्वत:च सांभाळायचं हे गोगल्गायीकडुन शिकवं. हाक मारताच क्षणीच तिथ क्षणात झेपावायचं आणि तोपर्यं बटणापाशीच थांबायचं हे इलेक्ट्रीसिटीकडुन शिकावं. सगळ्या पक्षांमध्ये घुबड हा एकमेव पक्षी कळप करुन रहत नाही, असं ऐकलय.एकटीने कसं जगाव. हे घुबडकडुन शिकव. समाज तप्त सूर्यासारखा असतोऽअगीचा कितीहि वर्षाव झाला तरीही सुर्यफुले सूर्याकडेच पाहत राह्तात.तोंड फिरवत नाईत.एखाद्या निरधार स्त्रीकडे समाज अशाच नजरेने पाहत असतोऽशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत कसं राहायचं ते सुर्यफुल शिकवतात. हे सर्व गुरु म्हणुन स्विकरले असेल तर जीवन जगणं सोप्प होईल.

-------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाण हाच नरक...................

-------------------------------------------------------------------------------------------------
आपण ईथून आता सात पवल चालू.आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावालागनिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मारताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध गेतलेला नाही.मी श्रधावन्त मात्र जरूर आहे.सौदर्य,संगीत,सुगंध,साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो.पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो.मला परमेश्वर व्हायच नाही.नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विच्रलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्ष्यम्य ठरतील. कुणाचही मन न दुखावण हिच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात,संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्त्नि हवीच होती,मात्र पत्त्नि झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.
मला सखी हवी आहे ..........होशील !!!..........

निवडक वपुं २

चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!

-------------------------------------------------------------------------------------------------
सावली देऊ शकणार्‍या वट वृक्षान
विश्रांतीला आलेल्या पाथस्थाला
बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का?
अस विचारायच नसत..............

-------------------------------------------------------------------------------------------------
जन्माला आलेल्या प्रत्येकाला आई आणि बापाच प्रेम लाभायलाच हव दोघांच्याही प्रेमात खूप फरक असतो कस सांगू?
मुलाला जे हव ते मुलाने मागण्यापूर्वीच आईला समजलेला असत.बापाला पुष्कळदा ते सांगितल्यावर समजत,
म्हणूनच हट्ट करून एखादी गोष्ट वसूल केल्याचा आनद वडिलांकडून भेटतो.
आईच प्रेम आंधळ,भाबडा महणून की काय,मुलाच चुकल की तो तिला स्वत:चा पराभव वाटतो.
स्वत:च नुकसान झाल असाच ती मानते.बापाच प्रेम डोळस महणून मुलाच्या हातून होणार्‍या चुकांचे फटके मुलालाच जास्त बसणार म्हणून तो कसावीस होतो.
अंगावर वार झाले तर आईचे प्रेम फुंकर घालते,पण बाप होणारे वार वरच्यावर अडवू शकतो.
म्हणूनच आईच्या प्रेमाला पारख होण्याची पाळी आली तर गाभार्याताली समई विझल्यासारख वाटत आणि बापच प्रेम लाभाल नाही तर त्याच देवळचा कळस कुणीतरी नेल्यासारखी अवस्था होते.
म्हणूनच मुलाला दोघही हवीत.
कडाक्याची थंडी पडली की शाल घेऊन भागात नाही आणि नुसत ब्लॅंकेट असल तरी पोरकेपणाची भावना तशीच राहते,
म्हणून आईच्या शलिच्या वर बापाच भरभक्कम ब्लॅंकेट हव............................
..........

-------------------------------------------------------------------------------------------------
आपण जसे आहोत तसे असायला नको होत;
हे वाटण ह्यालाच माणूस म्हणतात................

-------------------------------------------------------------------------------------------------
जिथे आहे, तिथे न रमत, ते मन................

-------------------------------------------------------------------------------------------------
जगात पुरुषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फार, म्हणजे फारच मोजके आहेत.
पुरुषार्थ म्हणजेजे रसिकता.
जबरदस्ती नव्हे, शारिरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद.
ज्याला हि मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला.
असा पुरुष, पुरुष असला तरी कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही........,
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे.
त्याने निर्माण केलेली सृष्टि पहा.
तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे.
इथं लहान काहीच नाही.
एक माणुस पहा!
केवढी विराट निर्मिती माणुस म्हणजे.
पर्वतराशी जेवध्या प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच माणुस
- प्रत्येक माणुस प्रचंड, अमर्याद आणि गुढही.
माणसाला बहाल केलेली पंचेन्द्रिये ही त्याचीच साक्ष.
नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया.
म्हणुनच हमी वाटते कि ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं,
तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टीने करणार नाही.
मझी श्रध्दा आहे, कि परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यु हा जिवनापेक्षा विरात आहे,
जीवनापेक्षा लोभस आसनार.

-------------------------------------------------------------------------------------------------

कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच.

-------------------------------------------------------------------------------------------------
आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे.


-------------------------------------------------------------------------------------------------
वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुडबुड करत नाही. आपण त्याला वापरतो, पण तो स्वतःच अस्तित्वही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो, तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही. तो तुम्हाला उध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात.

निवडक वपुं ३

आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू,

तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं.

असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील.

कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं, चिंतन आलं, मनन आलं,

आपल्या गप्पांतून लाव्यालाव्या किती, निन्दानालस्ति किती, आणि सम्रुध्दता किती ह्याचा विचार व्हावा.

-------------------------------------------------------------------------------------------------

आजही देशस्त, कोकणस्थ, करहाडे, c.k.p.., लींगायात, s.k.p., हे भेदभाव नाहीत का?

समोरची व्यक्ती ही आपल्यासारखीच जितिजागाती आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो?

सौंदर्याच्या बाबतीतही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, त्यातही भेदभाव आलाच.

गरीबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजुन मधे येतात.

परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टींभॉवती आजही आपण वावरत आहोत?

कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?

ह्या असल्या गोष्टी follow करणार्‍यांना किंवा indirectly त्या गोष्टींना सपोर्ट करणार्‍यांना माणूस म्हणताच येणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात,

शहानी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात..

अस्थिर माणसं जशी बारमधे सापडतात तशी सिधदिविनायकाच्या रांगेतही..

अर्थहीन श्रध्दा ही व्यसनासारखीच...

-------------------------------------------------------------------------------------------------

त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. it is a part of the game! पुरूष पाहणारच.

स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो.

भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही.

फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.

-------------------------------------------------------------------------------------------------

ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.

सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म.

कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून?

आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही,

झंझावातालाही असतं.

-------------------------------------------------------------------------------------------------

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत

-------------------------------------------------------------------------------------------------

बाह्यरुपावर काय आहे, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. अंतरंगाचा विचार करायची वाट बाह्यरुपावरुन जाते. "दिसण्यात काय आहे? माणसाचं मन पाहावं" हा युक्तिवाद बुद्धीचा, तो मनाचा कौल नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

-------------------------------------------------------------------------------------------------

पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....

-------------------------------------------------------------------------------------------------

मित्रांकडे, नातेवाईकांकडे आपण जातो....पाहुणचार होतो... चहा किंवा अन्य गोष्टींच्या चवी बद्दल नंतर सवयीने बोलले जाते....पण चव काय पदार्थांची असते... ज्या भावनेने तो पदार्थ तुम्हाला ऑफर केला जातो..त्या भावनेची पहिली चव...वस्तू नाममात्रच असते पुष्कळदा...

-------------------------------------------------------------------------------------------------

प्रेम म्हणजे ताजमहाल आहे.डोळे निवतील,

मनाला बरं वाटेल,ईतपतच खरं आहे.बांधण्याचा प्रयत्न करु नये.

-------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा ,उरलेले सगळे सांभाळण्याचे.

-------------------------------------------------------------------------------------------------

सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय ?

फक्त आठ्वानिंच्या राज्यात तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात.

त्या दुखाच्या असोत वा आनंदाच्या. दुखाच्या असतील तर त्या पाई वाया गेलेला भूतकाल आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण गेले, म्हणुन त्रास

-------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, अपेक्षेचे हुन्द्के, दुक्खाचे कढ आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहित असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मलुन् जनाच्या क्षणी असावा या सारखी इच्छा पूरी न होने ह्यासरखा शाप नाही. पण साक्षीदार मिलुन त्याला त्यातली उत्कटता न कलने ह्यासरखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपनाचा शाप बरा

-------------------------------------------------------------------------------------------------

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...

बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ??

-------------------------------------------------------------------------------------------------

"सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!"

-------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही.

कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच

पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत.

मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच

-------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापनाइतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, काहींची नंतर!

-------------------------------------------------------------------------------------------------

"आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो."

-------------------------------------------------------------------------------------------------

पारिजातकाचं आयूष्य लाभलं तरी चालेल. पण लयलुट करायची ती सुगंधाचीच !

-------------------------------------------------------------------------------------------------

समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने

पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.

-------------------------------------------------------------------------------------------------

मनात विचारांची साखळी असली कि रस्ता त्या साखळीपेक्षा कधीच लांब नसतो,

पण मनात नुसती ओढ असली कि रस्ता संपता संपत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

ियोग झाल्यावर माणुस का रडतो?

-ते फक्त वियोगाचं दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात,

त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणिवेचं दुःखही त्यात असतं.

-------------------------------------------------------------------------------------------------

"तंञावर फ़क्त यंञच जिंकता येतात. मनं जिंकण्यासाठी मंञ सापडावा लागतो."

-------------------------------------------------------------------------------------------------

"स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन

येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं असत."

-------------------------------------------------------------------------------------------------

ज्याला प्रेम समझतं तो वेळ पाळतो नि ज्याला फ़क्त स्वार्थ समझतो तो वेळ साधतो

-------------------------------------------------------------------------------------------------

"म्रुत्युवर कोणाला विजय मिळवता येत नाही.त्याचं कारण तो वेळ सा.भाळतो वर्तमान्लाळ जपतो मागच्य पुढच्या क्ष्शणाचं तो देणं लागत नाही."

-------------------------------------------------------------------------------------------------

निर्णय न घेता येणं यापेक्ष्शा मोठा दोष नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

सुख कधी मागुन मिळत नाही तर ते दुसर्याल दिल्याने मिळते

-------------------------------------------------------------------------------------------------

भीती वाटल्याशिवाय माणुस नम्र होत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

निवडक वपुं ४



-------------------------------------------------------------------------------------------------

माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक घाग्यांनी परमेश्वराने विणलेलं असतं. ते आपण फार काळजीपुर्वक जपावं लागतं. त्यातला एक घागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नाही. उलट त्याच्या आसपासचे घागेच नकळत उसवले जातात. आणि मग पडणारं छिद्र मनाला, हृदयाला फार मोठठी जखम करतं. आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते नि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी (निघणार) काढणार?

-------------------------------------------------------------------------------------------------

’जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल?’

"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा

दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."

"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.

त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.

ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."

-------------------------------------------------------------------------------------------------

असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो.

पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो.

स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.

ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात.

प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर

अर्पण करणारा लंकाधिपती असतो,

तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात.

-------------------------------------------------------------------------------------------------

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शनाच्या सीमेबाहेर त्याला पितालून लावेपर्यन्ताच सगला संघर्ष करावा लागतो त्याने एकदा स्वतहाची गति घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो....

असच मानसाचे आहे.

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उन्चिवर पोहचलात की आयुष्याताल्या अनेक समस्या ही उंचिच सोदवते...

-------------------------------------------------------------------------------------------------

दोन माणसांना जवळ आणू असं निव्व्ळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येत नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनवलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे दुस-या रंगात चांगले एकरुप होतात. ह्या कोणी का? म्हणून विचारले तर काय सांगायचं?

-------------------------------------------------------------------------------------------------

मैत्रितली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातुनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्ह. सायीखालच्या दूधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणचे आठवते त्या आधीपासून आपण मैत्रित पडलेले असतो.

-------------------------------------------------------------------------------------------------

आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..

-------------------------------------------------------------------------------------------------

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल.

स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.

आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही.

आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.

माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!

-------------------------------------------------------------------------------------------------

जेव्हा कुणी आपल्याला दु:ख देतं, तेव्हा त्याही पेक्षा मोठं दु:ख आपल्याही नकळत आपल्याकडून त्याना पोहोचलेलं असतं..!!

-------------------------------------------------------------------------------------------------

न मावणारं दु:ख नेहमीच जीवघेणं असतं.

कारण तुमचा जीवच तेव्हा दुखापेक्षा लहान झालेला असतो.

तेव्हा माणसाने नेहमीच दुखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं.

दु:ख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं भांडंवापरायचं.

पण इतरांच्या संदर्भात एकाअश्रुनेहि भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं..!

-------------------------------------------------------------------------------------------------