Tuesday 8 April, 2008

? आपल्या काळात ?

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
................................................


शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी...
वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी...
कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून...
शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी...
पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी...
महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी...
आपण थांबून राहिलेले असतो .
एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल,
अशी आपणच आपली समजूत घातलेली असते .
पण, असं काही ठरवण्यापूर्वी
आनंदी होण्याचं ठरवा.

® http://www.orkut.com/Community.aspx?cmm=33294354

No comments: